व्यसनमुक्तीच्या वाटा – भाग १
अलिकडे व्यसनी व्यक्तींच्या कुटुंबाशी थेट बोलण्याची संधी मिळू लागली आहे. त्यामुळे व्यसन आणि व्यसनमुक्ती या दोन्ही गोष्टी किती गुंतागुंतीच्या आहेत हे नव्याने लक्षात येत आहे. आपल्याकडे काही तथाकथित सुविचार हे इतके कॉमन झालेत की कुणीही, कधीही, कुठल्याही प्रसंगी ते तोंडावर फेकतात. उदाहरण द्यायचं झालं तर आयुष्यात तडजोड करावीच लागते, कुणीही परफेक्ट नसतं, आपल्याला पाहिजे ते नेहेमी मिळतंच असं नाही. वगैरे. धीर देण्यासाठी ही वाक्यं ठिकच आहेत. पण तडजोड म्हणून माणसे व्यसनात इतक्या टोकाला जातात की त्यांचं सारं आयुष्यच अपार दुःखाची एक मालिका बनून जातं. तडजोडीला येथे मर्यादाच नसते. आणि हे व्यसन आणि व्यसनमुक्ती दोन्हीला लागू आहे. व्यसनात तर भयंकर त्रास असतोच पण व्यसनमुक्त झाल्यावरदेखील जर माणसाने स्वभावदोषांवर काम केले नाही तर व्यसन फक्त बंद होतं बाकी वादविवाद, भांडणे, शिविगाळ हे सुरुच राहण्याची शक्यता असते. शिवाय मी व्यसन बंद केले हा अहंकार आणखी जोडीला येतो. सर्वप्रथम दारु पिण्याला असलेली समाजमान्यता हा मुद्दा महत्वाचा आहे. व्यसनाची सुरुवात इथून होते. अनेक भगिनी फोनवर सांगतात की त्यांचे पती अनेक वर्षे दारु पीत आहेत. इतरांप्रमाणेच कधीतरी. अगदी कॉलेजपासून. मग अचानक प्रमाण वाढते. आणि इतके की हाताबाहेर जाते. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात सोशल ड्रिंकिंग करणाऱ्यांपैकी व्यसनी कोण होणार याचे उत्तर आजदेखील विज्ञानाला सापडलेले नाही. त्यामुळे पहिला घोट घातक हे तत्व सर्वांसाठीच आहे हे मानणे भाग आहे. आता दुर्दैवाने